पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भिमानगर पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार; तर ६ जण गंभीर जखमी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क भीमानगर (ता. माढा) पुलाजवळ काल (२७ नोव्हेंबर) रात्री ११ वाजता मळीचा टैंकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन या अपघातात पाचजण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूरच्या दिशेने निघालेला मळीचा टैंकर (एम. एच. १४ सी. पी. ४०२०) भीमानगर येथे सरदारजी ढाब्यासमोर आला असता पुण्याच्या दिशेने निघालेला तांदळाचा ट्रक (एम. एच. २५ यू ४०४५) दुभाजकाला धडकून टैंकरवर जोरदार आदळला. या अपघातात मळीच्या टैंकरचा चालक जागीच ठार झाला, तर ट्रक पलटी होऊन चालकाच्या केबीनमधे बसलेले चारजण देखील जागीच ठार झाले. या अपघातात ट्रकमधील लहान मुले आणि महिलांसह तीनजण गंभीर जखमी झाले असून, सरडेवाडी टोलनाक्याचे, ओंकार पणारी, रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप, राहुल कदम, परमेश्वर कदम, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सरक, आणि सलमान पठाण व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील मृतांचा अक्षरशः चेंदा झाल्याचे आणि एकाचे डोके धडावेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातातील मृतांची आणि जखमींची नांवे...

हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतेय शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन; आंदोलन ठरू शकते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकार विरोधातील रागाच्या उद्रेकाची ठिणगी

इमेज
हर्षवर्धन पाटील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह आंदोलनाचा आज दुसरा दिवस; आंदोलनाच्य ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२८ नोव्हेंबर) :- थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी विजमहामंडळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज कनेक्शन सोडवत असून, विजमहामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आता इंदापूर तालुक्यातील शेतकरी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर एकवटू लागला असून, तोडगा निघाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे. तालुक्यात याआधीही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून रास्ता रोको, मोर्चे, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड असंतोष असून राज्यमंत्र्यांच्या घराबाहेरही आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे हे आंदोलन विविध समस्यांमध्ये घेरलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील आक्रोशाच्या उद्रेकाची ठिणगी ठरू शकतो. काल महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा फिस्कटल्यानंत...

इंदापूर पोलीसांच्या तत्परतेमुळे वाचले अपघातातील जखमींचे प्राण; उपजिल्हा रुग्णालयाची अब्रू मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर

इमेज
पोलीसांनी आपल्या खाजगी वाहनातून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले  मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ नोव्हेंबर) :- गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पटाईत असलेल्या इंदापूर पोलीसांची तत्परता आणि माणुसकी पुन्हा एकदा समोर आली असून, काल (२६ नोव्हेंबर) इंदापूर शहराच्या बायपासवरील भिमाई आश्रम शाळेच्या चौकात झालेल्या अपघातानंतर भर रस्त्यात वाहनाअभावी विव्हळत पडलेल्या जखमींबरोबर माणुसकीही दम तोडत असताना केवळ इंदापूर पोलीस ठाण्यातील तिघा देवदूतांनी दाखवलेली तत्परतेमुळे जखमींसह माणुसकीची लाजही शाबूत राहिली. पोलीसांनी वेळेवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने  अपघातातील जखमींचे प्राण वाचले असे तरी,  कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जखमींना उपचार मिळण्यास बराच वेळ वाट पाहावी लागली हे दुर्दैव. भिवंडीहून भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेली खाजगी बस इंदापूर शहराच्या बायपासवरील भिमाई चौकात सायंकाळी सव्वापाच वाजता चहापणासाठी थांबली असताना बसमधील  माही केशरनाथ पाटील (१३ वर्षे) आणि आदी रुपेश बाबरे (१० वर्षे) हे ...

केंद्राच्या चुकीच्या धोरणांविरोधातील काँग्रेसची जनजागरण यात्रा आज इंदापूरात

इमेज
नगरपालिकेच्या प्रांगणात साडेअकरा वाजता होणार सभा मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२६ नोव्हेंबर) :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असून, महागाईमुळे त्रस्त जनतेचा आक्रोश केंद्राच्या कानी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून १४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान राबवले जात आहे. हे जनजागरण अभियान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून, ही यात्रा आज संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) इंदापूर शहरामध्ये सकाळी १० वा. ३० मिनिटांच्या सुमारास दाखल होणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिली आहे. भाजप विरोधी सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये केंद्र सरकार राजकीय कुटील हेतूने कृत्रिम भाववाढ करीत असल्याने महाराष्ट्रासह भाजप विरोधी सरकार असलेल्या इतर राज्यांमध्ये महागाईने कळस गाठला आहे. जनता त्रस्त असून, केंद्राच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सुरू असलेली जनजागरण यात्रा आज काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे निरीक्षक उत्कर्षा रूपवते आणि दादू शेठ खान, तसेच जिल्ह...

मातंग समाजातील लोकांवर भ्याड हल्ला; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा - लहुजी शक्ती सेनेची मागणी

इमेज
तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देताना   हल्लेखोरांना तात्काळ अटक न केल्यास लहुजी शक्ती सेना छेडणार राज्यभर आंदोलन मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२३ नोव्हेंबर) :- लोणी खुर्द (ता. रिसोड, जि. वाशिम) येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे चित्र असलेला फलक लावण्याच्या कारणावरून मातंग समाजातील महिला, मुले व वृद्धांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज (२३ नोव्हेंबर) यासंदर्भात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने इंदापूर येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. लोणी खुर्द येथे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे चित्र असलेला बोर्ड लावण्याच्या कारणास्तव गावातील जातीयवादी मानसिकतेच्या गावगुंडांनी २० नोव्हेंबरच्या सायंकाळी मातंग समाजाच्या वस्तीवर लोखंडी रॉड, कुऱ्हाडी आणि इतर धारदार हत्यारांसह हल्ला चढवत मातंग समाजातील वयोवृद्ध, महिला, पुरुष आणि मुलांना जबर मारहाण केली असून, या भ्याड हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या निंदनीय घटनेचा लहुजी शक्ती सेने...

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारावरून इंदापूर नगरपरिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फ्लॅक्स वॉर; विरोधकांचे अस्तित्व दिसल्याची शहरात चर्चा

इमेज
विरोधकांनी लावलेला फलक मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२१ नोव्हेंबर) :- केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण (२०२१) अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेसंदर्भात विशेष उपक्रम राबवत संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळविला असून, नगरपरिषदेच्या अभिनंदनाचे फलक संपूर्ण शहरात लागले असताना आता विरोधकांनी हा पुरस्कार खोटा असल्याचा आरोप करत शहरातील मुख्य चौकांमध्ये शहरातील कचऱ्याच्या ठिकाणांचे फोटो पुरस्काराच्या फोटोसह फलकाच्या माध्यमातून लावल्याने सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा फ्लॅक्स वॉर इंदापूरकरांना सध्या पाहायला मिळतोय. सलग चौथ्यांदा कचरामुक्त शहर म्हणून देशपातळीवर मानांकन मिळाल्याने काल (२० नोव्हेंबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मुख्याधिकारी रामराजे कापरे, विद्यमान नगरसेवक भरत शहा आणि जावेद शेख यांनी केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला होता. तदनंतर संपूर्ण शहरात अभिनंदनाचे फलक  सत्ताधाऱ्यांनी लावलेला फलक सत्ताधाऱ्यांकडून तसेच...

शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापुढे अहंकारी सत्ताधाऱ्यांना अखेर झुकावे लागले - स्वप्नील सावंत

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१९ नोव्हेंबर) :- मागील अनेक महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रही आंदोलनाला अखेर आज यश आले. हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा आज खुद्द प्रधानमंत्र्यांनी केली असून, त्यांनी देशाची माफीही मागितली आहे. आता याबाबत विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून, देशाच्या अन्नदात्यांनी लोकशाही पध्दतीने केलेल्या सत्याग्रहापुढे अहंकारी सत्ताधाऱ्यांना अखेर झुकावे लागल्याचे मत इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लागू करण्यात आलेले हे तिन काळे कायदे रद्द व्हावेत यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध स्तरावर आंदोलन करण्यात आले होते. इंदापूर तालुक्यात देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. या मागणीला यश आल्याने हा खऱ्या अर्थाने सर्व आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांचा विजय आहे. यामुळे भाजपच्या शासनकाळात दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेल्या लोकशाहीला नक्कीच बळकटी मिळणार असल्याचे मत स्वप्नील सावंत यांनी व्यक्त...

अनुकंपा आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक संघटनांचा पाठिंबा; राज्यमंत्र्यांशी होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार?

इमेज
आंदोलनकर्ते आणि पाठिंबा देणारे सर्व मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१९ नोव्हेंबर) :- अनुकंपा तत्वानुसार वारसाहक्काने नोकरीवर घेण्यास इंदापूर नगरपरिषदेच्या आस्थापना विभागातील कर्मचारी जाणूनबुजून विलंब करत असल्याचा आरोप करत मयत कामगारांच्या वारसदारांनी सोमवारपासून (१५ नोव्हेंबर) इंदापूर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. धरणे आंदोलनात परिवर्तित झालेल्या या आंदोलनाला आता पाठिंबा चांगलाच वाढू लागला असून, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपोषणस्थळी उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविला. मयतांच्या वारसदारांना अद्याप नियुक्ती न देण्यामागे न्यायालयाच्या आदेशाची पार्श्वभूमी असली तरी, इंदापूर नगरपरिषद आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेविषयी सकारात्मक असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी स्पष्ट केले असून, मंगळवारी राज्यमंत्र्यांशी होणाऱ्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहावे लागणार आहे. हे देखील वाचा - महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी बहुजन परिषद कटिबद्ध - बिभीषण लोखंडे इंदापूर नगरपरिषदेतील कर्मचारी लक्ष्मी शंकर धोत्रे, मंगल रामा ढावरे, तानाजी न...

महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी बहुजन परिषद कटिबद्ध - बिभीषण लोखंडे

इमेज
निवडीचे पत्र देताना बिभीषण लोखंडे आणि इतर मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१९ नोव्हेंबर) :- महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी बहुजन परिषद कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बहुजन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी केले. काल (१८ नोव्हेंबर) निमगाव केतकी येथील संत सावता माळी मंदिरात बहुजन परिषदेच्या महिला तालुका आघाडीच्या अध्यक्षपदी सुरेखा राहुल मिसाळ तर अंगणवाडी कर्मचारी सेविकेच्या संघटनेच्या अध्यक्षपदी पुनमताई निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ हे होते. हे देखील वाचा - बलीप्रतिपदा दिन बळीराजाची पुण्यतिथी म्हणून साजरा व्हावा - बहुजन परिषदेची मागणी या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शालनताई भोंग, पंचायत समिती सदस्य देवा जाधव, माजी सभापती अंकुशराव जाधव, बहुजन परिषद सदस्य सचिव विजय राव गायकवाड, तालुका प्रहारचे अध्यक्ष संजय राऊत, सूर्य क्रांतीचे उपाध्यक्ष घनश्याम निंबाळकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय हेगडे गुरु...

शिवइतिहासाला जोपासण्यासाठी इंदापूरमध्ये शिवसृष्टी होणे गरजेचे - शिवव्याख्याते गणेश धालपे

इमेज
किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांसह शिवव्याख्याते गणेश धालपे आणि आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१७ नोव्हेंबर) :- छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील आदर्श आणि कल्याणकारी राजे होते. त्यांच्या इतिहासातून आजही शिवप्रेमी जगण्याची, लढण्याची आणि संघर्षाची प्रेरणा घेत असून, शिवरायांचा इतिहास जोपासण्यासाठी ऐतिहासिक अशा इंदापूर शहरात शिवसृष्टी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश धालपे यांनी केले. आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीत 'किल्ले बनवा' स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र देण्याकामी काल (१६ नोव्हेंबर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या स्पर्धेत इंदापूर, बारामती व माढा तालुक्यातील जवळपास २५० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. इंदापूर शहर हे ऐतिहासिक शहर असून, वीर मालोजीराजेंची समाधी देखील याच शहरात आहे. त्यामुळे शिवरायांच्या इतिहासाला जोपासण्यासाठी इंदापूर नगरीत शिवसृष्टी होणे गरजेचे असल्याचे मत शिवरायांच्या इ...

विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे; भिमाई आश्रमशाळेत आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात न्यायाधीश पी. एल. पाटील यांचे प्रतिपादन

इमेज
कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश पी. एल. पाटील यांचा सत्कार करताना  ॲड . राहुल मखरे मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१६ नोव्हेंबर) :- शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन इंदापूर येथील दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील यांनी इंदापूर शहरातील भिमाई आश्रम शाळेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ इंदापूर यांच्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषणात केले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह उपस्थितांना कायदेविषयक विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूर दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील यांनी भूषविले. हे देखील वाचा - सन्मानाने हिस्सेदारी दिल्यास युती शक्य; ॲड. राहुल मखरे यांचा राष्ट्रवादीला स...

लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना आणि शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना चादरींचे वाटप

इमेज
लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त चादर वाटप करताना मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१५ नोव्हेंबर) :- हजारो क्रांतिवीरांना प्रेरणा ठरणारी ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ ही प्रतिज्ञा घेऊन ब्रिटिश शासनाविरोधात जहाल पध्दतीने लढा देणारे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीच्या निमित्ताने काल (१४ नोव्हेंबर) लहुजी शक्ती सेना आणि शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीने इन्द्रेश्वर चौकातील लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील अनेक गरजवंतांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने उबदार चादरींचे वाटप करून जयंती विधायक पध्दतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक आण्णा काटे, नाना काटे, लहुजी शक्ती सेनेचे इंदापूर तालुका कोअर कमिटीचे अध्यक्ष तानाजी भाऊ सोनवणे, इंदापूर तालुका युवक कार्याध्यक्ष अक्षय भाऊ बागाव, युवा नेते सोमनाथ भाऊ थोरात, मयूर भाऊ ढावरे, गोरख भाऊ ढावरे, सागर जगताप, मंथन पवार, अक्षय जगताप, दादा गवळी, साजन ढावरे...

सत्तेत सन्मानाने हिस्सेदारी दिल्यास युती शक्य; अॅड. राहुल मखरे यांचा राष्ट्रवादीकडे इशारा

इमेज
पत्रकार परिषदेत बोलताना  अॅड.  राहुल मखरे मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० नोव्हेंबर) :- व्यक्तिगत स्तरावर कोणाशीही आपले वैर नसले तरी, गल्ली ते दिल्लीपर्यंत महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या व सामान्यांशी निगडित अनेक समस्यांना जबाबदार असलेल्या भाजपचे समर्थन शक्य नसून, स्थानिक पातळीवर आपण कमळाला  कसल्याही परिस्थितीत फुलू देणार नसल्याचे अॅड. राहुल मखरे यांनी स्पष्ट केले असून, सत्तेत सन्मानाने हिस्सेदारी दिल्यास युती शक्य असल्याचे सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांनी राष्ट्रवादीशी युतीचे संकेत दिले आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (७ नोव्हेंबर) इंदापूर शहरातील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीने रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीचे अनेक उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते, किंबहुना बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे अनेकांना पराभूतही व्हावे लागले होते. यावेळी परिस्थिती अधिक चांगली अस...

श्रीगोंद्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीच्या दिवशी संप

इमेज
संपाला बसलेले श्रीगोंदा आगारचे एसटी कर्मचारी मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क श्रीगोंदा (७ नोव्हेंबर) :- ऐन दिवाळीच्या दिवशी श्रीगोंदा येथील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. पगार वाढ होईपर्यंत, महागाई भत्ता आणि बोनस मिळेपर्यंत व एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा श्रीगोंदा आगारातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. श्रीगोंदा येथील एसटी डेपोच्या प्रवेश द्वारावर गुरुवारी (४ नोव्हेंबर) सकाळपासून कर्मचारी बेमुदत संपास बसले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असून, ऐन दिवाळीत हक्कांसाठी भांडावे लागत असल्याने ही दिवाळी आमच्यासाठी काळी दिवाळी असल्याचे सांगितले. यावेळी एसटी महिला कर्मचारी एच. एन. पिल्ले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि आमची आर्थिक कुचंबणा थांबवावी. अनेक वर्ष आम्ही या मागण्यासाठी सरकारकडे साकडे घालतोय, मात्र आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात आहे. कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून ...

बलिप्रतिपदा दिन बळीराजाची पुण्यतिथी म्हणून साजरा व्हावा - बहुजन परिषदेची मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी :- चेतन चव्हाण (संपादक) निमगाव (६ नोव्हेंबर) :- बहुजनांचा राजा बळी यांचा घातपात करण्यात आला असून, बहुजनांच्या अज्ञानातून साजरा होत असलेल्या पाडव्याचा आनंद टाळून हा दिवस बळीराजाची पुण्यतिथी म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी बहुजन परिषदेने केली. निमगाव येथील सुवर्णगणेश मंदिरात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) बलिप्रतिपदा दिनानिमित्त आयोजित बळीराजाच्या पुण्यतिथी दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली. कार्यक्रमामध्ये बोलताना बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी, बळीराजा या बहुजनांच्या दिलदार, दानशूर व पराक्रमी राजाचा कपटाने खून करण्यात आल्याचे म्हटले. काही लोकांनी खोटी कथा रचून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याने आज बहुजन समाज बळीराजाची पुण्यतिथी नव्हे तर आनंद साजरा करत असल्याचे सांगताना या दिवशी बळी राजांची पुण्यतिथी साजरी केली जावी अशी मागणी लोखंडे यांनी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले यांनी, रंगनाथन आयोगाचा अहवाल तात्काळ लागू करण्याची आग्रही मागणी केली. तर इंदापूर तालुका स्वाभिमानी विकास मंचाचे अध्यक्ष युवराज अण्णा मस्के, परिवर्तन समितीचे घ...

इंदापूरमध्ये जाहिरातींचे बॅनर करताहेत राजमुद्रेचा अपमान; प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत

इमेज
बॅनरमुळे झाकली गेलेली देशाची राजमुद्रा विना परवानगी बॅनर लावणाऱ्या आणि छापून देणाऱ्यावर कारवाई व्हावी - अॅड. आशुतोष भोसले मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (५ नोव्हेंबर) :- सध्या इंदापूर शहरात जाहिरातींचे बॅनर (होर्डींग्स) लावण्याची स्पर्धा लागली असून, या होर्डींग्समुळे राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान वारंवार होत असूनही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी खासदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने अकलूज चौकात बसवलेल्या राजमुद्रेच्या आजूबाजूला सतत वेगवेगळ्या जाहिरातींचे मोठमोठे बॅनर लावले जात असल्याने या बॅनरमुळे राजमुद्रा पूर्ण झाकली जात असून एकप्रकारे राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होत असल्याचे अॅड. आशुतोष भोसले यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे होर्डिंग्ज लावण्याआधी त्याची कायदेशीर परवानगी पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेकडून घेणे, त्याची शासकीय रक्कम अदा करणे आवश्यक असताना या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. स्थानिक प्रशासन मात्र यावर कुठेही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे शासकीय, सार्वजनिक आणि  कोणाच्याही खाजगी जागेत कोणीही,...

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांना साखर आयुक्तांचा दणका? कारखान्यांचा गाळप परवाना रद्द?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (४ नोव्हेंबर) :- शेतकऱ्यांची ३०० कोटींची एफआरपी थकवल्याच्या कारणास्तव राज्यातील ४३ साखर कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रोखल्याची बातमी सध्या समोर येत असून, या कारखान्यांमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कर्मयोगी आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या इन्द्रेश्वर कारखान्यांचा समावेश असल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बातमीत तथ्य असेल तर हा हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का मानावा लागेल. यामध्ये माजी खासदार धनंजय महाडिक, समाधान अवताडे, पंकजा मुंडे, संजय काका पाटील, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कारखान्याचा समावेश असल्याची माहितीही प्रसारमाध्यमांतून समोर येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्याने परवाने रोखण्यात आले आहेत. एफआरपी दिल्यानंतरच गाळप परवाना देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केल्याने कारखान्यांचा हंगाम नुकताच सुरू झाला असताना परवाना रोख...

बेकायदेशीर पिस्तुल आणि जिवंत काडतूसांसह दोघांना अटक; वालचंदनगर पोलीसांची कारवाई

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क वालचंदनगर (२ नोव्हेंबर) :- बेकायदेशीर पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह वालचंदनगर पोलीसांनी दिनेश धायगुडे (रा. सावतामाळीनगर, अंथुर्णे, ता. इंदापूर) आणि रुकेश खुरसिद भोसले (रा. सायकरवस्ती, राशिन, ता. कर्जत, जि.अहमदनगर) या दोघांना अटक केली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनेश धायगुडे बेकायदेशीर पिस्तुलसह आल्याची बातमी गोपनिय सुत्रांमार्फत वालचंदनगर पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी तपास केला असता दिनेश धायगुडे याच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल व २ जिवंत काडतुसे आढळून आली. या संदर्भात दिनेश धायगुडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचे पिस्तुल रुकेश खुरसिद भोसले याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व विक्री केल्याप्रकरणी संबंधित दोघांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा - ब्रेकिंग - कर्मयोगी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा उद्रेक; शेतकऱ्यांनी काटा पाडला बंद सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक...

ब्रेकिंग - कर्मयोगी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक; शेतकऱ्यांनी काटा बंद पाडला

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क गागरगांव (२ नोव्हेंबर) :- इंदापूर तालुक्यासह आसपासच्या अनेक तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम कारखान्याचा गाळपाचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी न मिळाल्याने आज अखेर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात बघायला मिळाला. दिवाळी उद्यावर आली असताना बिलाची रक्कम अनेक हेलपाट्या आणि अनेक विनवण्यानंतरही पदरी न पडल्याने आज शेवटी इंदापूर, माढा, कर्जत, करमाळा आणि एकूणच आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी कर्मयोगीचा काटा बंद पाडला. बिले जमा झाल्याखेरीज काटा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी यावेळी घेतला. त्यामुळे भाजपमध्ये गेल्याने हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असली तरी कर्मयोगी कारखान्याला ऊस पाठवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाल्याचे दिसत आहे. पत्रकारांशी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या इलाजासाठीही आपल्याकडे पैसे नसल्याचे व कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या हाता पाया पडूनही आपले गाऱ्हाणे ऐकण्यात न आल्याचे म्हटले. ट्रॅक्टर चालकांनी मागील द...