सामान्य जनतेला काय हवंय हे जाणलेल्या असामान्य कर्तृत्वाच्या या नेत्याच्या गाडीची काच कधीच वर नसते...
संपादकीय १ जून १९६८ रोजी इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात जन्मलेले दत्तात्रय विठोबा भरणे यांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांचे राज्यमंत्री असा प्रवास थक्क करणारा आहे. गर्भश्रीमंत व सघन शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही अत्यंत संयमी, शांत आणि गर्वाचा लवलेशही नसलेल्या या नेत्याने अल्पावधीत इंदापूर तालुक्यातील जनतेच्या ह्रदयात आपली जागा निर्माण केली आहे. सत्ता नसतानाही कोट्यवधींचा निधी तालुक्यात आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. मंत्री पदाच्या अवघ्या दोन वर्षाच्या अल्प कार्यकाळात तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती तालुक्यात निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 'न भूतो न भविष्यती' इतका निधी इंदापूर तालुक्याला उपलब्ध करून दिला आहे. परिणामी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'तुम्ही केवळ इंदापूर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहात थोडा निधी बारामतीलाही द्या असे म्हणावे लागले.' कोणताही प्रबळ राजकीय वारसा नसताना भरणे यांनी महाराष्ट्राच्या र...