पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कांदलगाव प्रकरण - भ्रष्टाचाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे; मात्र भ्रष्टाचार झालाच नसेल तर?

इमेज
संपादकीय कांदलगावातील १३ वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात ३९ लाखांचा फ्रॉड झाल्याचे प्रकरण समोर आले होते. यासंदर्भात माध्यमांमध्ये रस्ते गायब या मथळ्याखाली अनेक बातम्याही प्रसारित झाल्या. परिणामी वेगवेगळे उपक्रम राबवून कांदलगाव ग्रामपंचायतीला शासनाचे अनेक पुरस्कार मिळवून देण्यात, किंबहुना इंदापूर तालुक्याच्या एका कोपऱ्यातून कांदलगावला राज्य पातळीवर पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ग्रामसेविका स्वाती लोंढे यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) १९६४ (४) अन्वये बदली आणि वेतनवाढ रोखण्यासारख्या बदनामीकारक शिक्षेचा आसूड उगारण्यात आला. मात्र या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली नसल्याची, अनेक दोषींना वाचवण्यात आल्याची आणि प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याची कुजबुज होऊ लागली आहे. खरं तर इंदापूर तालुक्यातील कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामात झालेल्या टक्केवारीची आणि भ्रष्टाचाराची चर्चा तालुक्याला नवी नाही. अनेक निवेदने, आंदोलने झाली, मात्र एकाही भ्रष्ट ठेकेदारावर, संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. किंतु परंतु कांदलगाव रस्त्यांच्या प्रकरणात सलग तीन वर्ष...

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (११ जानेवारी) :- दु चाकीवरून आलेल्या तिघा युवकांनी एका ६५ वर्षीय महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करत रक्तबंबाळ केले. मारहाणीची ही घटना शुक्रवारी (५ जानेवारी) इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या कमल मोतीलाल परदेशी (रा. सिद्धेश्वर मंदिराजवळ, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून अमोल गणेश परदेशी, आदित्य संजय परदेशी आणि क्षितीज संजय परदेशी (तिघेही रा. खडकपूरा, इंदापूर) या तिघा युवकांविरोधात मंगळवारी (९ जानेवारी) इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी ह्या इंदापूर शहरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे काम पाहतात. शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्या बाजारपेठेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून घरी जात असताना हा प्रकार घडला. दुचाकीवर आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना पाठीमागून धडक दिली. तदनंतर आरोपींनी फिर्यादी यांना इंदापूर आणि बारामती येथील न्यायालयातील तक्रार मागे घेण्याचे बजावत शिवीगाळ आणि दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी आणि ल...

तरीही पत्रकारांनी प्रश्न विचारायचा नाही?

इमेज
संपादकीय पतीच्या जाचाला कंटाळलेल्या कळाशी (ता. इंदापूर) येथील तेजस्विनी नवनाथ सुर्यवंशी या २८ वर्षीय महिलेने १६ नोव्हेंबर २०२३ रोजी आत्मदहन केले होते. परिणामी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित महिलेला न्याय, तर दोषींवर कारवाई होणे अपेक्षित असताना, घडल्या गंभीर प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या जितेंद्र जाधव आणि इम्तिहाज मुलाणी या दोघा पत्रकारांवरच इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे दिवसाढवळ्या एवढी गंभीर घटना घडूनही पत्रकारांनी गप्प राहायचं का? पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. ३० मिनिटांच्या आसपास या महिलेने आत्मदहन केले होते. तदनंतर इंदापूर पोलिसांनी तिचा पती नवनाथ सुर्यवंशी याच्यावर गुन्हा दाखल केला. या दाखल  गुन्ह्यात इंदापूर पोलीस ठाण्याच्या कंपाऊंडलगत कालठण नं. २ कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला असल्याचे (१२२०/२०२३ ) नमूद करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने या महिलेने टोकाचे पाऊल उचलले, तथा हा प्रकार पोलीस ठाण्याच्या आवारातच घडला असल्याचे...