पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाळू माफियांवर भिगवण पोलीसांची धडक कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ बोटी केल्या उध्वस्त

इमेज
प्रतिनिधी : समीर सय्यद भिगवण (२४ सप्टेंबर) : काल रात्री भिगवण पोलीसांनी वाळू माफियांवर धडक कारवाई करत तक्रारवाडी परिसरातील उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त केल्या. या कारवाईनंतर भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल इन्कलाब रशीद पठाण यांनी फिर्याद दिली असून, दोघा बोट मालकांसह ९ जणांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (२३ सप्टेंबर) रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी भिगवण पोलीसांनी इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी परिसरातील उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर धडक कारवाई केली असून वाळू उपसा करणाऱ्या २ फायबर बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आणि भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली भिगवण पोलीसांनी ही कारवाई केली. वाळू माफियांवर भिगवण पोलीसांनी केलेली धडक कारवाई व्हिडीओच्या माध्यमात...

शेतकऱ्यांची पोरं बंडखोर बनल्यास शासकीय यंत्रणा व राज्यकर्ते जबाबदार - शेतकरी पुत्राची खदखद

इमेज
प्रतिनिधी : समीर सय्यद मंगळवार (२३ सप्टेंबर)  : केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर अचानक बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील कांदयाचे भाव कमीहोणार हे निश्चित. सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका शेतकऱ्याने राज्यपाल कोश्यारींना पत्र लिहून भेटण्याची वेळ मागितली असून, शेतकऱ्यांची मुले भविष्यात बंडखोर झाल्यास त्याला शासकीय यंत्रणा व राज्यकर्ते जबाबदार असल्याचे सांगत आपली खदखद व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे यासाठी आता शेतकरी पुत्र पुढे आले आहेत. केंद्र आणि राज्याचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना या संदर्भात सोलापुरातील युवा शेतकरी विरेश आंधळकरने इमेलद्वारे भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील नेते, अभिनेत्री कंगना राणावत तसेच इतर बड्या व्यक्तींना भेटीसाठी सहज उपलब्ध होणारे राज्यपाल कष्टकरी शेतकऱ्याच्या पुत्रांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरीपुत्र विरेश आंधळकरचे राज्यपालांना पाठवलेले पत्र मा. श्री भगतसिंह कोश्यारी महामह...

कोरोना रुग्णांच्या सेवेतून पळ काढणार नाही - डॉ. अविनाश पाणबुडे

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर (२३ सप्टेंबर) : इंदापूर तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हृदयरोग तज्ञ डॉ. अविनाश पाणबुडे नुकतेच कोरोनामुक्त होऊन स्वगृही परतले. राधिका गणेश मंदिरासमोर राधिका सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. पाणबुडे यांनी कोरोनाग्रस्त ते कोरोनामुक्त या प्रवासाबद्दल आपले अनुभव सांगितले. आपण लवकरच पुन्हा इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी हजर राहणार असल्याचे आश्वासन देखील दिले. इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करीत असताना डॉ. अविनाश पाणबुडे देखील कोरोना बाधित झाले होते. सोमवारी (२१ सप्टेंबर) रात्री ९.३० वा. च्या सुमारास ते मुंबईहून कोरोनावर यशस्वी मात करून आपल्या स्वगृही परतले. याप्रसंगी मुंबईहून आणण्यासाठी आपली रुग्णवाहिका उपलब्ध करून देणारे राधिका सेवा संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाघ आणि मित्र परिवाराच्या वतीने राधिका गणेश मंदिरासमोर फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत डॉ. पाणबुडे या...

तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल; इंदापूर शिवसेना शहर प्रमुखांचा बँका, फायनान्स कंपन्यांना सज्जड इशारा

इमेज
प्रतिनिधी : समीर सय्यद  इंदापूर (२१ सप्टेंबर) : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असताना इंदापूर तालुक्यातील बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या, बचतगट नागरिकांना कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावत आहेत. कोरोनाचे संकट निवळेपर्यंत कर्जवसुलीसाठी तगादा लाऊ नये, अन्यथा याद राखा इंदापूर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा इंदापूर शिवसेना प्रमुख मेजर महादेव सोमवंशी यांनी दिला आहे. बँका अथवा फायनान्स कंपन्यां कर्जाच्या वसुलीसाठी त्रास देत असतील तर नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन मेजर सोमवंशी यांनी केले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे इंदापूर तालुक्यातील नागरिक भलतेच त्रस्त आहेत. गेले सहा महिने लॉकडाऊनच्या लपंडावामुळे तालुक्यातील आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने व्यवसाय, शेती, शिक्षण, आणि लघुउद्योगांसाठी कर्ज घेणारे व्यापारी, मजूर, मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आरबीआयने नागरिकांना मोरोटॉरियमच्या माध्यमातून ३१ ऑगस्ट पर्यंत कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सूट दिली असली तरी या काळातील हप्त्यांवरील व्याज भरण्याची टांगती...