पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी विधेयक शेतकरी व संविधान विरोधी; विधेयकाविरोधात इंदापूरमध्ये काँग्रेसची सह्यांची मोहीम

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर (२९ ऑक्टोबर) : केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार व शेतकरी विधेयकाचा विरोधी पक्षांसमवेत देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. तर काँग्रेस पक्ष हे विधेयक शेतकरी, कामगार आणि संविधान विरोधी असल्याचे संबोधत या विधेयकाविरोधात संपूर्ण देशभर तब्बल २ कोटी स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून काल इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये शेतकरी व कामगारांशी निगडित ३ विधेयके पारित केली होती. अनेक विरोधी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच देशातील अनेक शेतकरी संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे. तर २५ सप्टेंबरला शेतकरी संघटनांनी बंदही पुकारला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात या कायद्याला स्थगिती दिली आहे. याच विधेयकाविरोधात शिरोमणी अकाली दलच्या नेत्या व केंद्रीय मंत्री हरसीम्रत कौर बादल यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांनी या विधेयकाला मोदी सरकारचे ३ काळे अध्यादेश ...

तर इंदापूर शहर काँग्रेस कमिटी नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडेले

इमेज
मुख्याधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी चेतन चव्हाण (संपादक) बुधवार (२२ ऑक्टोबर) : इंदापूर शहरातील राजेवलीनगर, शेंडेमळा, शाहूनगर, जावईवाडी भागातील गटारी आणि रस्त्यांच्या संदर्भात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आणि बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील रहिवाश्यांच्या घरात पाऊसाचे व गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले होते. वरील समस्यांमुळे या भागांतील लोकवस्तीमध्ये आता रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सदर परिसराशी निगडित विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी इंदापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना काल निवेदन देण्यात आले.  बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते, ज्याला या भागातील अनेक तक्रारी नंतरही न सोडवण्यात आलेली ड्रेनेजची समस्या कारणीभूत असल्याचा ठपका काँग्रेस कमिटीने काल दिलेल्या निवेदनात ठेवला आहे. तर इंदापूर शहरात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थ...

भटक्या विमुक्त जाती जमातींचा नागरिकत्व सुधारणा (CAA) कायद्याला विरोध का?

इमेज
कोरोनाने देशातील अनेक समस्यांचा गुणाकार केला असला तरी, अनेकांना सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा (CAA) कायद्यापुढे बाकीच्या सर्व समस्या क्षणिक व क्षुल्लक वाटत आहेत. कोरोनामुळे संविधानाच्या आत्म्याला छेद देणाऱ्या या कायद्याशी संलग्न बाबी काही काळ चर्चेत नसल्या तरी या कायद्यामुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक या सर्वच स्तरावर शोषण झालेल्या भटक्या विमुक्त जाती जमातींसमोर भविष्यात काय अडचणी निर्माण होणार आहेत, त्यांना या कायद्याबाबत काय वाटते याविषयी सामाजिक कार्यकर्त्या 'दीपा पवार' यांचा 'द वायर' मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख खूप महत्वपूर्ण आहे. हा लेख आम्ही जसाच्या तसा याठिकाणी देत आहोत. भटके विमुक्त म्हणजे शासन प्रशासनासाठी बऱ्याच वेळी गरजेचा नसलेला विषय आणि महत्वपूर्ण नसलेला समुदाय. वोट बँकेला नजरेसमोर ठेऊन मराठा, आदिवासी, मुस्लिम या समुदायाचे विषय किमान चघळले तरी जातात. मात्र राहण्याचा ठिकाणा नसलेला, रोजच्या प्राथमिक प्रश्नांकडे, मग ते शिक्षण असो वा आरोग्य किंवा मग सामाजिक सुरक्षा याची एका चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहणारे, आम्ही भटके विमुक्त हे नेहमीच ...

इंदापूर शहरातील बाबा चौकात अपघात; अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू, तर दोघे जण जखमी

इमेज
समीर सय्यद (उप संपादक) रविवार (११ ऑक्टोबर) : इंदापूर शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर हायवेवर बाबा चौकात दूध वाहतूक करणाऱ्या टँकरची धडक बसल्याने अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज (११ ऑक्टोबर) दुपारी सव्वाएकच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संपूर्ण इंदापूर शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. टँकर चालकाला अटक करण्यात आली असून विविध कलमान्वये त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील पहा - आगीत बेडशिंग येथील शेतकऱ्याचे घर भस्मसात; मदतीची गरज सविस्तर वृत्त असे की , आज दुपारी सव्वाएकच्या सुमारास गौरव प्रकाश मिसाळ व अश्विनी ज्ञानेश्वर साठे हे बाबा चौकातील एका खाजगी रुग्णालयात लहान बाळाला उपचारासाठी घेऊन गेले होते. उपचार झाल्यानंतर ते आपल्या एमएच-४२-एझेड-२५५८ या स्कुटी वरुन बाबा चौकातून घराच्या दिशेने राज कोल्ड्रिंक्स आणि सोडा शॉपी जवळ आले असता मागून भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने निघालेल्या नेचर डिलाईट कंपनीच्या दूध टँकरने स्कुटीस जोरदार धडक दिली व पळून जाण्याचा उद्देशाने अंदाजे शंभरफुटांपर्यंत फरफटत नेले. या घट...

हाथरस येथील दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या - स्वाभिमानी चर्मकार महासंघाची मागणी

इमेज
समीर सय्यद इंदापूर (४ ऑक्टोबर) : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी इंदापूर येथे स्वाभिमानी चर्मकार महासंघाने केली आहे. अशा मागणीचे लेखी निवेदन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले. १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा गावातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. काल (३ ऑक्टोबर) इंदापूर येथील गेस्ट हाऊस या ठिकाणी कोरोना संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात देशात दलित समाजावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना देखील शासन कोणतेही कठोर पाऊले उचलताना दिसत नसल्याचे नमूद करताना, अशा अमानुष घटनांना आळ...