तर अशाने ऐतिहासिक इंदापूरात ऐतिहासिक काहीच उरणार नाही
| तलावाचा खचलेला भाग व लावलेले बॅरीगेट्स |
चेतन चव्हाण (संपादक)
इंदापूर (७ जानेवारी) :- ऐतिहासिक इंदापूर शहरात भविष्यात ऐतिहासिक असं काहीच उरणार नसून, शाहू महाराजांच्या गुरूंचा वारसा असलेला भार्गवराम तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्नही मागील एका वर्षापासून दुर्लक्षित आहे. तलावाच्या पूर्वेकडील भिंत सप्टेंबर (२०२०) महिन्यात झालेल्या अतिृष्टीमुळे ढासळली होती. प्रशासनाने त्वरा करत धोकादायक बनलेल्या भागाला बॅरिगेट्स लावून सुरक्षित केले खरे, मात्र एका वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे असून, ऐतिहासिक तलावाची दुरावस्था, वाहतुकीला अडथळा आणि अपघाताच्या शक्यतांमुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. दुरूस्तीचे काम निधीअभावी रखडले असल्याचे स्पष्टीकरण देत नगराध्यक्षांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता ऐतिहासिक तलावाच्या डागडुजीसाठी आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी इंदापूरकरांना जिल्हाधिकारी मेहेरबान होण्याची वाट पाहावी लागणार आहे.
भार्गवराम तलावाला ३०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. असे म्हटले जाते की, सन १७१० मध्ये पडलेल्या दुष्काळात छत्रपती शाहू महाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी धाडवशीकर यांनी या तलावाची निर्मिती केली होती. येथे भार्गवराम ऋषींनी तपसाधना केल्यामुळे तलावास त्यांचे नाव देण्यात आले होते. पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून तलावातील पाण्याच्या निचऱ्याचा फायदा शहरातील छोट्या छोट्या आड आणि विहिरींना व्हायचा. त्यामुळे प्रत्येक गल्लीत नागरिकांना पिण्यासाठी व वापरासाठी आड व विहिरींचे
| खचलेल्या भागाची पाहणी करताना नगराध्यक्षा |
| दुर्लक्षामुळे मालोजीराजेंच्या गढीची झालेली अवस्था |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा